Manokalp Diwali Ank 2023

Manokalp Diwali Ank 2023


Unabridged

Sale price $0.50 Regular price$1.00
Save 50.0%
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

'मनोकल्प'चा प्रत्येक दिवाळी अंक एक वेगळा, मानसशास्त्राशी निगडित विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. वाचकांची मिळालेली साथ हीच परंपरा पुढे नेण्यासाठी प्रेरक ठरते. यंदा आम्ही 'बदल' या मुख्य संकल्पनेवर आधारित लेख, कथा आणि कविता सादर करत आहोत.

जुने‐नवे पिढ्यांतील संभाषणात 'आमच्या वेळी असं नव्हतं', 'तो काळच वेगळा होता' अशी वाक्ये ऐकायला मिळतात आणि मग काळानुसार घडलेल्या बदलांचा विचार आपोआप सुरू होतो. बदल हे फक्त व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण सृष्टीचा नियम आहेत. जन्मापासून आयुष्यभर व्यक्तिमत्त्व, परिस्थिती, स्वभाव अशा अनेक स्तरांवर बदल घडत राहतात-कधी अनपेक्षित, कधी स्वागतार्ह, कधी आव्हानात्मक. सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारलेले बदल मात्र शेवटी हितकारक ठरतात.

मानसशास्त्रीय दृष्टीने बदल म्हणजे विचार, भावना आणि वर्तनात होणारा रूपांतराचा प्रवास. यासाठी दृष्टीकोन, सवयी, विश्वास बदलावे लागतात. थेरपी, आत्मपरीक्षण किंवा आयुष्यातील घटना या प्रक्रियेला गती देतात. शेवटी अशा बदलांचा उद्देश व्यक्तीला सक्षम बनवणे आणि जीवनावर नियंत्रण पुन्हा मिळवून देणे हा असतो.

भूतकाळ पुन्हा येत नाही-'गुजरा हुआ जमाना…' हे गीत आठवण करून देतं की बदल अपरिहार्य आहेत. त्यामुळे वर्तमानाचा विचार करून भविष्याच्या दिशेने प्रगतिस अनुकूल असे बदल स्वीकारत पुढे जाणे आवश्यक आहे.

आजच्या स्पर्धात्मक आणि असुरक्षिततेने व्यापलेल्या काळात जगणे हीच मोठी लढाई बनली आहे. अशा वेळी आशेचा एक किरण दिसावा, तो मोठा होत सर्वांना आनंद व समाधान द्यावा-हीच मनापासून प्रार्थना. सर्वत्र शांतता नांदो, आणि प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहो!